सामाजिक सुधारणा

13 Dec 2022 11:01:38
आपण जातीपातिंमध्ये विभागले गेलो असल्याने आपण पारतंत्र्यात गेलो. आपल्याला अत्याचार आणि आक्रमणे सहन करावी लागली असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे विष्णुबुवांनी हिंदू समाजातील जाती व्यवस्था, अस्पृश्‍यता आणि स्त्री दास्यत्व या कुप्रथांना कडाडून विरोध केला होता. पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुध्दीकरण, मंदिर प्रवेश इत्यादी सामाजिक प्रश्नांसंबंधी त्यांनी आपले पुरोगामी विचार आग्रहाने मांडले. स्त्रीदास्यत्व नष्ट करावयाचे असेल, तर स्त्रीशिक्षणाशिवाय पर्याय नाही असे त्यांचे ठाम मत होते. ‘वेदोक्त धर्मप्रकाश’ (1859) आणि ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ (1867) ह्या त्यांच्या ग्रंथांमध्ये त्यांचे प्रागतिक विचार विशेषत्वाने व्यक्त झाले आहेत. ‘राज्यकारभार चालवणारे कामगार’ कधीही वंशपरंपरेने नेमता कामा नयेत असे स्पष्टपणे सांगितले आहे. राज्यात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीची जन्म, मृत्यू, शिक्षण, विवाह, प्रवास यांची नोफ्लद शासनाने ठेवावी अशा अनेक महत्वाच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0